आजची पिढी आणि किल्ले | Youth and Trekking-Marathi

आजची पिढी आणि किल्ल्यांचे वेड :

आजची पिढी आणि किल्ले : “किल्ले” हा शब्द कानावर पडताच, पाहिलं डोक्यात विचार येतो, तो म्हणजे माझ्या राजांचा.  हो बरोबर ! माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा.  आज ज्या किल्लांचा इतिहास ऐकत आपण मोठे झालो जे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात, ते त्यांच्यामुळेच.  पण ते मिळवणं इतकं सोपं होत का? नक्कीच नाही.  वयाच्या १६व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात, स्वतःच्याच रक्ताने अभिषेक करून काही मोजक्या साथीदारांच्या मदतीने स्वराज्य स्थापन करण्याची घेतलेली शपथ – ते – भारतातील सात नद्यांचे पाणी आणून स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा केलेला शिव-राज्याभिषेक.  हा प्रवास दोन ओळीत सांगण्या सारखा अजिबात नाही. या ३० वर्ष्याच्या अति खडतर प्रवासात, किती लढाया, किती चढाया, किती राजनीतीचे पेच आणि किती युक्त्या केल्या असतील ते खुद्द महाराजांनाच माहित नसतील, तर इतिहास कारांचं दूरच. कित्येक मावळ्यांची आहुती, कित्येक कुटुंबाचे त्याग, कित्येकांची स्वराज्य भक्ती आणि कित्येकांचे परिश्रम, या सर्वांवर उभं राहिलं स्वराज्य. आणि डौलाने मिरवतात ते गड-किल्ले या भगव्या ध्वजाच्या छत्रछायेत.

मुलांचा कल :

आजची पिढी आणि किल्ल्यांचे वेड
Marathi Rang

पण आज काय होऊन बसलंय.  आजच्या पिढीला कितीसं माहित आहे या इतिहासाबद्दल, माझ्या राजांन बद्दल आणि त्यांनी सजविलेल्या किल्यांबद्दल.  आजच्या पिढी साठी मोबाईल हेच त्यांचे स्वराज्य आणि त्यावरील गेम्स हेच त्यांचे किल्ले. अगदी २-३ वर्षाच्या मुलाच्या हातात देखील तुम्ही मोबाईल पाहू शकता. आता मला सांगा जेथे मोबाईलची सवय नव्हे लत लागलेल्या या पिढीला भटकंतीची सवय कशी लागणार. त्यातून ऐतेहासिक किल्ले आणि स्थळं याविषयी तर मुळीच नाही. सागरी-किनारे आणि रुबाबदार हॉटेल्स मधले स्विमिंग पूल्स यातच त्यांच्या भटकंतीची हौस पूर्ण होते.

लहान मुलांना खरंच किल्ले म्हणजे काय हे माहीतच नसतं. आपल्या घरातही हा विषय कधी निघत नाही, मग त्यांची तरी काय चूक. ४थी- ५वी पासून शालेय अभ्यास क्रमात किल्ले आणि महाराष्ट्राचा इतिहास याविषयीची माहिती त्यांना मिळते.  ते ही आत्ताच्या कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मेडीयम च्या शाळांमधून किती प्रमाणात शिकवलं जाते याविषयी न-बोललेच बरं. परीक्षेत मार्क्स मिळावे म्हणून रट्टा मारून ते वाचतात.  बस इतकाच त्यांचा “किल्ले” नावाशी संबंध. ना मुलांच्या मनात किल्लांविषयी माहिती मिळवण्याचं कुतूहल किंवा उत्सुकता असते, नाही आजच्या शिक्षाकांमध्ये ती शिकविताना दिसते.  

पालकांची जबाबदारी : (आजची पिढी आणि किल्ले)

अर्थात हि सर्व चूक मुलांचीच आहे असे नाही. हि पालक म्हणून आपलीही जबाबदारी आहे.  आपल्या राज्याचा इतिहास हा आपल्या मुलांना माहित असलाच पाहिजे. नसेल तर तो त्यांना माहित करून दिला पाहिजे. त्यासाठी त्यांना इतिहासाची पुस्तके वाचावंसं सांगितली पाहिजे.  आज-काल तर ई-बुक्स ही उपलब्ध आहेत ती डाउनलोड करून मुलांना वाचण्यास सांगितली पाहिजेत.  एखाद्या किल्लाचे चित्र काढायला सांगायचे, एखाद्या किल्ल्याची संपूर्ण माहित नेटवरून पाहून लिहावयास सांगा.  क्ले चे किल्ले बनविण्यास सांगा. मुलांच्या आवडी नुसार आणि त्यांच्या कलेने, जसे शक्य असेल त्या परीने  मुलांच्या मनात किल्ल्यांविषयी गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आजवर मी पाहिलेला सर्वात लहान ट्रेकर आम्हाला अलिबागच्या सागर गडावर भेट, तो केवळ ३ वर्षाचा होता आणि त्याच्या आई वडील आणि काकां सोबत पडत्या पावसात त्याचा चौथा ट्रेक करत होता. हे त्याच्या वडिलांचं सांगितले.

ट्रेकचे फायदे :

झालेच तर याचे फायदेच होतील.  एक सतत मोबाईल मधील झरे पाहणाऱ्या मुलांना, निसर्गाच्या खऱ्या-खुऱ्या ओढ्यां मध्ये पाय भिजवता येईल.  जंगलातील मुक्तपणे उडणाऱ्या पक्ष्यांची किलबिल ऐकता येईल. गडाच्या कुशीतील गारवा, ती शुद्ध मोकळी हवा, आणि स्वतःची क्षमता अनुभवता येईल. स्वतःवरचा विश्वास वाढेल, आपण काही तरी मिळविले, असे वाटेल.  राजगडावरची सकाळ, हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्याचा थरार, राजमाचीचा गारवा, आणि कलावंतीण किल्ल्याची सुबकता. असे आणि बरेच किल्ले सांगता येतील. चित्रातील देखावे आणि वाचनातील शब्दानं पेक्षा हा अनुभव स्वतःनेच घेणे १००० पटीहून अधिक चांगले.

दुसरं म्हणजे नवीन पिढीला किल्ल्यांच्या इतिहासात रुची लागली, तर ते गडांना भेटी देतील. त्यांनी भेटी दिल्या तर गडांचे-किल्ल्यांचे संवर्धन होईल. जर किल्ल्यांचे संवर्धन झाले तर किल्ले अस्तित्वात राहतील.  नाहीतर डायनासोर प्रमाणे असे किल्ले होते हे चित्रात आणि चित्रपटात दाखवले जातील.  एक संस्कृती लयास जाईल, एका युगाचा अस्थ होईल.

तुम्हाला जर माहिती आवडली असेल, तर स्वतः कडेच ना ठेवता लेख तुमच्या मित्रांसोबत नक्की सामायिक (share) करा.  तुमचे अभिप्राय किंवा सूचना जरूर कळवा.  आमच्या या प्रयत्न मुले किमान एका व्यकितचे जरी मत परिवर्तन झाले तरी आमची मेहनत सार्थकी लागली असे समजू.  धन्यवाद !

Author : अंकिता सोनटक्के आणि संतोष भरणुके

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

marathirang.com
अंकिता सोनटक्के

नमस्कार, मी अंकिता तेलवणे सोनटक्के, महाराष्ट्र, रायगड-मोहोपाडा, कॉमर्स पदवीधर. माझा सर्वात आवडीचा छंद नृत्य आणि माझ्याच पुरता मर्यादित असलेला माझा दुसरा छंद म्हणजे माझे लेखन. मी मराठी रंग या ब्लॉगच्या मार्गाने तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक निर्मळ प्रयत्न आहे. मला आशा आहे आपणा सर्वांनाही आवडेल. धन्यवाद !

अंकिता सोनटक्के

नमस्कार, मी अंकिता तेलवणे सोनटक्के, महाराष्ट्र, रायगड-मोहोपाडा, कॉमर्स पदवीधर. माझा सर्वात आवडीचा छंद नृत्य आणि माझ्याच पुरता मर्यादित असलेला माझा दुसरा छंद म्हणजे माझे लेखन. मी मराठी रंग या ब्लॉगच्या मार्गाने तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक निर्मळ प्रयत्न आहे. मला आशा आहे आपणा सर्वांनाही आवडेल. धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!